वादळी वाऱ्यासह पावसाचा होळ शिवाराला तडाखा; महसूल व कृषी विभागाकडून नुकसानीचे पंचनामे सुरू:

संपादक हसीबुर शेख ✍️ :-

नगरदेवळा दर्पण मराठी लाईव्ह न्युज:-

नगरदेवळा व होळ येथील दिनांक ३१ मे रोजी झालेल्या जोरदार वादळी पावसाने पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा जवळ गाव होळ शिवारातील शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीची दखल घेत, पाचोरा तहसीलदार आणि कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आज, मंगळवार, २ जून रोजी नुकसानग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करण्यात आले.वादळी वाऱ्यामुळे पिकांचे आणि शेतीचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर, आजच्या पंचनामा मोहिमेत तालुक्याच्या सहाय्यक कृषी अधिकारी सौ. वैशाली चव्हाण, होळ शिवाराचे तलाठी शिरसा आप्पा आणि कोतवाल सुधाकर पाटील यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली आणि अहवाल तयार केला.

यावेळी : भाजप नेते व अनुप कृषी केंद्राचे संचालक प्रणय दिलीप भंडारकर आणि विलास भामरे यांनीही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन परिस्थितीची पाहणी केली आणि त्यांना धीर दिला.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा: प्रणय भंडारकर आणि विलास पाटील यांनी घेतली पिकांची पाहणीनुकत्याच झालेल्या पावसामुळे आणि नैसर्गिक संकटामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या कठीण काळात शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी भाजपा नेते व अनुप कृषी केंद्राचे संचालक प्रणय मुन्ना दिलीप भंडारकर आणि माजी उपसरपंच विलास पाटील (पिंटू भामरे) यांनी थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शासनस्तरावर सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. या प्रसंगी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकप्रतिनिधींनी थेट बांधावर येऊन दखल घेतल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये काहीसा दिलासा मिळाला आहे.

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: null;
brp_mask:0;
brp_del_th:null;
brp_del_sen:null;
delta:null;
module: photo;hw-remosaic: false;touch: (0.41527778, 0.41563275);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 58;

या शेतकऱ्यांचे झाले मोठे नुकसान:

वादळामुळे प्रामुख्याने खालील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, त्यांचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत:

प्रकाश बाळीराम परदेशी,गंगासिंग राधाकिसनसिंग परदेशी,सुनील विठ्ठल परदेशी,अफजल खान फत्ते खान,साहेबराव चिमण पाटील,शासनाने या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित आणि भरीव मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.

२०२५ च्या नुकसान भरपाईपासून शेतकरी अजूनही वंचित; माजी सरपंचांची टीका:-

मागच्या वर्षी (२०२५ मध्ये) झालेल्या नैसर्गिक नुकसानीचे पंचनामे होऊनही अद्याप शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळालेला नाही, अशी खंत नगरदेवळा येथील माजी सरपंच प्रकाश बळीराम परदेशी आणि अफजल खान फत्ते खान यांनी व्यक्त केली आहे.प्रशासनाने पंचनामे करून बराच काळ लोटला असला तरी, नुकसान भरपाई अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन बाधित शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळवून द्यावी, अशी मागणी प्रकाश परदेशी आणि अफजल खान यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे.होळ शिवारात पंचनाम्यादरम्यान संवेदनहीनता;

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणाऱ्या अधिकाऱ्यांवर संताप:-

निसर्गाच्या लहरीपणामुळे होणारे नुकसान आणि त्यातच प्रशासकीय यंत्रणेची असंवेदनशीलता यामुळे बळीराजा दुहेरी संकटात सापडला आहे. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे होळ (ता. पाचोरा) शिवारात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, या नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी आलेल्या पथकाने वापरलेली भाषा अत्यंत आक्षेपार्ह असून, त्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडावरच “याला काही नुकसान म्हणता का? केवळ दोन-तीन झाडेच तर पडली आहेत,” असे म्हणत शेतकऱ्यांची थट्टा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.निसर्गाच्या कोपाने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. पिकांचे आणि बागायतीचे मोठे नुकसान झाले असताना, भरपाई मिळण्याच्या आशेने शेतकरी पंचनामा करणाऱ्या पथकाकडे आशेने पाहत होते.

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: null;
brp_mask:0;
brp_del_th:null;
brp_del_sen:null;
delta:null;
module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 45;

मात्र, पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करताना अत्यंत निष्काळजीपणा दाखवला. शेतकऱ्यांचे दुःख समजून घेण्याऐवजी, “तुमचे कुठे नुकसान झाले आहे असा उपरोधिक सवाल करत, पडलेल्या झाडांकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न झाला.पंचनामा हा शासनाच्या नियमानुसार आणि पारदर्शकपणे होणे अपेक्षित असताना, अधिकारी अशा प्रकारे शेतकरी विरोधी भूमिका का घेत आहेत, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. अशा प्रकारच्या बेजबाबदार विधानांमुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: null;
brp_mask:0;
brp_del_th:null;
brp_del_sen:null;
delta:null;
module: photo;hw-remosaic: false;touch: (0.5416667, 0.4528536);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 56;

Published by संपादक हसीबुर शेख नगरदेवळा

नगरदेवळा दर्पण मराठी Live न्यूज ✍️

Leave a comment