महावितरणच्या मनमानी कारभाराविरुद्ध नगरदेवळ्यात शेतकरी संतप्त विष्णू नगर फिडरवरील वीज समस्येबाबत सब स्टेशनवर धडक निवेदन सादर

संपादक हसीबुर शेख
नगरदेवळा दर्पण मराठी लाईव्ह न्युज


सध्या कडक उन्हाचा कडाका आणि त्यातच महावितरणच्या ढिसाळ नियोजनामुळे नगरदेवळा परिसरातील शेतकरी पुरते हवालदिल झाले आहेत. नगरदेवळा शिवारातील विष्णू नगर ४ फिडर अंतर्गत येणाऱ्या ३ नंबर फिडरवर शासनाकडून शेतकऱ्यांसाठी दिवसा ६ तास वीज पुरवठा मंजूर असताना, प्रत्यक्षात मात्र केवळ २ तास वीज दिली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या सततच्या वीज खंडित होण्यामुळे (लाईट जाण्यामुळे) शेतकऱ्यांच्या लाखो रुपयांच्या केळी बागा जळून खाक होण्याच्या मार्गावर असून, केळी उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे.
या तीव्र अन्यायाविरुद्ध आज शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक झाला. संतप्त शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली थेट नगरदेवळा सब स्टेशनवर धडक दिली आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत लेखी निवेदन सादर केले.

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: null;
brp_mask:0;
brp_del_th:null;
brp_del_sen:null;
delta:null;
module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 54;


६ तासांचे आश्वासन, फक्त २ तास पुरवठा! केळी बागा धोक्यात
विष्णू नगर परिसरातील शेतकऱ्यांनी लाखो रुपयांचे कर्ज काढून, अतोनात कष्ट करून केळीच्या बागा फुलवल्या आहेत. केळीच्या पिकाला या दिवसांत पाण्याचा मोठा आधार लागतो. शासनाच्या नियमानुसार शेतकऱ्यांना किमान ६ तास वीज मिळणे बंधनकारक आहे. परंतु, महावितरणच्या विस्कळीत कारभारामुळे विष्णू नगर फिडरवर केवळ २ तास वीज चालते आणि वारंवार ट्रिपिंग होते. यामुळे पाणी असूनही पिकांना देता येत नसल्याने डोळ्यांदेखत केळीच्या बागा सुकू लागल्या आहेत. “महावितरणच्या या मनमानीमुळे आमच्या तोंडचा घास हिरावला जात आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया येथील शेतकऱ्यांनी दिली.
शेतकरी संघटनेची सब स्टेशनला धडक
शेतकऱ्यांच्या या गंभीर समस्येची दखल घेत शेतकरी संघटनेने आक्रमक पाऊल उचलले. आज नगरदेवळा सब स्टेशन गाठून महावितरणचे अधिकारी कदम साहेब यांना घेराव घालण्यात आला आणि मागण्यांचे निवेदन देण्यात आले. वीज पुरवठा तात्काळ पूर्ववत करून मंजूर वेळेनुसार अखंडित वीज न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा याप्रसंगी देण्यात आला.
निवेदन देताना उपस्थित पदाधिकारी व शेतकरी:
यावेळी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष नाना महाजन, शहर अध्यक्ष मयुर मारवाडी, यांच्यासह प्रमुख शेतकरी मंगेश चौधरी, भैया महाजन, प्रकाश महाजन, सत्यवान महाजन, गोकुळ महाजन, प्रफुल सोनार आदींसह विष्णू नगर भागातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांचा इशारा
“आम्ही वीज बिल नियमित भरतो, मग आम्हाला हक्काची वीज का मिळत नाही? महावितरणने जर तात्काळ विष्णू नगर फिडरचा वीज पुरवठा सुधारला नाही आणि आमच्या केळी बागांचे नुकसान थांबवले नाही, तर आगामी काळात महावितरण कार्यालयाला कुलूप ठोकून तीव्र ठिय्या आंदोलन छेडले जाईल ज्याची जबाबदारी प्रशासनाची असेल.

Published by संपादक हसीबुर शेख नगरदेवळा

नगरदेवळा दर्पण मराठी Live न्यूज ✍️

Leave a comment