पाचोरा येथे भाजप-महायुतीचा निर्धार: जळगाव विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवाराला मान्यवरांचे बळ; आमदार किशोरआप्पा पाटील यांच्याकडून शुभेच्छा

पाचोरा (विशेष/प्रतिनिधी):

नगरदेवळा दर्पण मराठी लाईव्ह न्युज:-

जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या महत्त्वाच्या निवडणुकीसाठी अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी पाचोरा येथे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि स्थानिक आमदार मा. श्री. किशोरआप्पा पाटील यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान आमदार किशोरआप्पा पाटील यांनी उमेदवाराचे अभिनंदन करून आगामी वाटचालीस सदिच्छा दिल्या.

मान्यवरांची उपस्थिती आणि पाठिंबा

या महत्त्वपूर्ण प्रसंगी महायुतीतील सर्वच घटक पक्षांमधील दिग्गज नेते उपस्थित होते. यामध्ये खासदार श्रीमती स्मिताताई वाघ, आमदार श्री. राजुमामा भोळे, जळगाव पूर्व विभाग भाजप जिल्हाध्यक्ष श्री. चंद्रकांत बाविस्कर, शिवसेना जळगाव जिल्हाप्रमुख व माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. रावसाहेब मनोहर पाटील, तसेच श्री. जितेंद्र पाटील, श्री. मधुकर काटे आणि श्री. सुमित पाटील यांसारख्या प्रमुख मान्यवरांचा समावेश होता. याशिवाय शिवसेनेचे सर्व नगरसेवकही यावेळी उपस्थित राहून त्यांनी आपला सक्रिय पाठिंबा दर्शविला.

“जनतेची सेवा करण्याचा संकल्प दृढ”

सर्व मान्यवरांकडून मिळालेल्या शुभेच्छा, पाठिंबा आणि त्यांच्यावरील विश्वासाने आगामी निवडणुकीत अधिक जोमाने आणि आत्मविश्वासाने कार्य करण्याची मोठी प्रेरणा मिळाल्याची भावना उमेदवाराने व्यक्त केली आहे. महायुतीतील सर्व नेत्यांच्या उपस्थितीने जळगाव विधानपरिषद निवडणुकीच्या रिंगणात महायुतीची ताकद अधिकच वाढली असल्याचे स्पष्ट होत आहे.

कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

पाचोरा येथील या भेटीगाठीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, आगामी निवडणूक महायुती एकदिलाने लढणार असल्याचे या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. आगामी काळात ही साथ आणि विश्वास जपत विकासाचा अजेंडा जनतेपर्यंत पोहोचवला जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

देशसेवेतून समाजसेवेकडे…सुभेदार जितेंद्र पाटील यांचा भव्य सेवापूर्ती सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

देशसेवेसाठी आयुष्यातील तब्बल 23 वर्षे समर्पित करणारे सार्वे गावाचे सुपुत्र तथा भारतीय सैन्यदलातील सुभेदार जितेंद्र रोहिदास पाटील यांच्या सेवापूर्तीनिमित्त आयोजित करण्यात आलेला भव्य सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. देशभर विविध ठिकाणी सेवा बजावतांना त्यांनी शांतीदूत म्हणून इस्राईल व सिरीया येथेही महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या. त्यांच्या या उल्लेखनीय सेवेला सलाम करण्यासाठी सार्वे गावासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी सुभेदार जितेंद्र पाटील यांची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल – ताशांच्या गजरात आणि देशभक्तीपर घोषणांनी परिसर दणाणून गेला. यानंतर आयोजित सत्कार सोहळ्यात परिसरातील माजी सैनिकांचाही विशेष सन्मान करण्यात आला.यावेळी जिल्हा परिषद माजी सदस्य तथा शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब मनोहर गिरधर पाटील, भाजप नेते प्रणय ऊर्फ मुन्नाभाऊ दिलीप भांडारकर, आमदार मंगेश चव्हाण यांचे वडील रमेश नाना चव्हाण, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या राज्य उपनेत्या शुभांगी पाटील, जिल्हा परिषद माजी सदस्य प्रमोद पाटील, पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रविंद्र (रवी बाबा) पाटील, समाधान पाटील, हभप ज्ञानेश्वर माऊली हिंगोणे, माजी नगरसेवक अभिजीत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.सैनिकाची मुलगी मनस्वीचे भावनिक मनोगत :- कार्यक्रमात सुभेदार पाटील यांची कन्या मनस्वी जितेंद्र पाटील हिने आपल्या वडिलांविषयी भावना व्यक्त करतांना सैनिक कुटुंबाचे आयुष्य, त्याग आणि अभिमान यांचा उल्लेख केला. तिच्या मनोगताने उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.* सैनिकांना कलेक्टरपेक्षाही अधिक मान मिळायला हवा – शुभांगी पाटील :- राज्य उपनेत्या शुभांगी पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, लहानपणापासून देशसेवेचे स्वप्न पाहणाऱ्या जितेंद्र पाटील यांनी ते प्रत्यक्षात साकार केले. सैनिकांना समाजात सर्वोच्च सन्मान मिळायला हवा. जिथे सामान्य नागरिक पोहोचू शकत नाहीत, तिथे सैनिक देशाचे रक्षण करण्यासाठी उभे असतात. सैनिकांच्या यशामागे त्यांच्या कुटुंबियांचा त्यागही तितकाच महत्त्वाचा असतो. आता देशसेवेप्रमाणेच समाजसेवेतही त्यांनी योगदान द्यावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.* सैनिकांच्या सत्कारासाठी जात-धर्म लागत नाही – समाधान पाटील :- समाधान पाटील यांनी सैनिकांचा गौरव करतांना सांगितले की, सैनिकांच्या सन्मानासाठी जात किंवा धर्माची आवश्यकता नसते. आपण सुरक्षित आणि आनंदी जीवन जगतो, कारण सीमांवर सैनिक सतत पहारा देत असतात. सैनिकांना सॅल्यूट करणे आणि त्यांचा सन्मान करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, असे त्यांनी नमूद केले.* शेतकरी, सैनिक आणि शिक्षक सर्वाधिक प्रामाणिक – प्रमोद पाटील :- जिल्हा परिषद माजी सदस्य प्रमोद पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, त्यांच्या वडिलांनीही सैन्यात सेवा बजावली असल्याने सैनिक कुटुंबांच्या त्यागाची त्यांना जाणीव आहे. शेतकरी, सैनिक आणि शिक्षक हे समाजातील सर्वात प्रामाणिक घटक असून देशसेवेपेक्षा मोठे पुण्य दुसरे कोणतेही नाही, असे ते म्हणाले.* एकुलत्या मुलाला देशसेवेसाठी दिल्याबद्दल मातेला वंदन – प्रणय भांडारकर :- भाजप नेते प्रणय ऊर्फ मुन्नाभाऊ भांडारकर यांनी सुभेदार पाटील यांच्या मातेला वंदन करीत, एकुलत्या मुलाला देशसेवेसाठी पाठविण्याचे धाडस मोठे असल्याचे सांगितले. सैनिकांच्या यशामागे त्यांच्या पत्नीची आणि कुटुंबाचीही मोठी भूमिका असते, असे त्यांनी नमूद केले.* कुटुंबाचे ऋण कधीच फेडू शकणार नाही – सुभेदार जितेंद्र पाटील :- सत्काराला उत्तर देतांना सुभेदार जितेंद्र पाटील भावूक झाले. त्यांनी 23 वर्षांच्या सेवाकाळातील चांगले-वाईट अनुभव, आव्हाने आणि आठवणींना उजाळा दिला. सेवानिवृत्त झालो असलो तरी सहकाऱ्यांशी आणि समाजाशी असलेले नाते कायम राहील. माझ्या कुटुंबाने दिलेला त्याग आणि साथ यांचे ऋण मी कधीच फेडू शकणार नाही, असे सांगत त्यांनी उपस्थितांचे आभार मानले.* तरुणांनी सैन्यभरतीकडे वळावे – रावसाहेब पाटील :- जिल्हा परिषद माजी सदस्य तथा शिवसेना जिल्हाप्रमुख यांनी प्रथम सुभेदार पाटील यांच्या आई-वडिलांना नमन केले. त्यांनी सांगितले की, 23 वर्षे देशसेवा करणे हे साधे काम नाही. आजच्या तरुणांनी सैन्यभरतीकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे. जितेंद्र पाटील यांनी आपल्या अनुभवाचा लाभ तरुणांना देऊन अधिकाधिक युवक सैन्यात दाखल होतील यासाठी मार्गदर्शन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

वादळी वाऱ्यासह पावसाचा होळ शिवाराला तडाखा; महसूल व कृषी विभागाकडून नुकसानीचे पंचनामे सुरू:

संपादक हसीबुर शेख ✍️ :-

नगरदेवळा दर्पण मराठी लाईव्ह न्युज:-

नगरदेवळा व होळ येथील दिनांक ३१ मे रोजी झालेल्या जोरदार वादळी पावसाने पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा जवळ गाव होळ शिवारातील शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीची दखल घेत, पाचोरा तहसीलदार आणि कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आज, मंगळवार, २ जून रोजी नुकसानग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करण्यात आले.वादळी वाऱ्यामुळे पिकांचे आणि शेतीचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर, आजच्या पंचनामा मोहिमेत तालुक्याच्या सहाय्यक कृषी अधिकारी सौ. वैशाली चव्हाण, होळ शिवाराचे तलाठी शिरसा आप्पा आणि कोतवाल सुधाकर पाटील यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली आणि अहवाल तयार केला.

यावेळी : भाजप नेते व अनुप कृषी केंद्राचे संचालक प्रणय दिलीप भंडारकर आणि विलास भामरे यांनीही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन परिस्थितीची पाहणी केली आणि त्यांना धीर दिला.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा: प्रणय भंडारकर आणि विलास पाटील यांनी घेतली पिकांची पाहणीनुकत्याच झालेल्या पावसामुळे आणि नैसर्गिक संकटामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या कठीण काळात शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी भाजपा नेते व अनुप कृषी केंद्राचे संचालक प्रणय मुन्ना दिलीप भंडारकर आणि माजी उपसरपंच विलास पाटील (पिंटू भामरे) यांनी थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शासनस्तरावर सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. या प्रसंगी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकप्रतिनिधींनी थेट बांधावर येऊन दखल घेतल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये काहीसा दिलासा मिळाला आहे.

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: null;
brp_mask:0;
brp_del_th:null;
brp_del_sen:null;
delta:null;
module: photo;hw-remosaic: false;touch: (0.41527778, 0.41563275);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 58;

या शेतकऱ्यांचे झाले मोठे नुकसान:

वादळामुळे प्रामुख्याने खालील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, त्यांचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत:

प्रकाश बाळीराम परदेशी,गंगासिंग राधाकिसनसिंग परदेशी,सुनील विठ्ठल परदेशी,अफजल खान फत्ते खान,साहेबराव चिमण पाटील,शासनाने या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित आणि भरीव मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.

२०२५ च्या नुकसान भरपाईपासून शेतकरी अजूनही वंचित; माजी सरपंचांची टीका:-

मागच्या वर्षी (२०२५ मध्ये) झालेल्या नैसर्गिक नुकसानीचे पंचनामे होऊनही अद्याप शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळालेला नाही, अशी खंत नगरदेवळा येथील माजी सरपंच प्रकाश बळीराम परदेशी आणि अफजल खान फत्ते खान यांनी व्यक्त केली आहे.प्रशासनाने पंचनामे करून बराच काळ लोटला असला तरी, नुकसान भरपाई अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन बाधित शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळवून द्यावी, अशी मागणी प्रकाश परदेशी आणि अफजल खान यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे.होळ शिवारात पंचनाम्यादरम्यान संवेदनहीनता;

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणाऱ्या अधिकाऱ्यांवर संताप:-

निसर्गाच्या लहरीपणामुळे होणारे नुकसान आणि त्यातच प्रशासकीय यंत्रणेची असंवेदनशीलता यामुळे बळीराजा दुहेरी संकटात सापडला आहे. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे होळ (ता. पाचोरा) शिवारात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, या नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी आलेल्या पथकाने वापरलेली भाषा अत्यंत आक्षेपार्ह असून, त्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडावरच “याला काही नुकसान म्हणता का? केवळ दोन-तीन झाडेच तर पडली आहेत,” असे म्हणत शेतकऱ्यांची थट्टा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.निसर्गाच्या कोपाने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. पिकांचे आणि बागायतीचे मोठे नुकसान झाले असताना, भरपाई मिळण्याच्या आशेने शेतकरी पंचनामा करणाऱ्या पथकाकडे आशेने पाहत होते.

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: null;
brp_mask:0;
brp_del_th:null;
brp_del_sen:null;
delta:null;
module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 45;

मात्र, पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करताना अत्यंत निष्काळजीपणा दाखवला. शेतकऱ्यांचे दुःख समजून घेण्याऐवजी, “तुमचे कुठे नुकसान झाले आहे असा उपरोधिक सवाल करत, पडलेल्या झाडांकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न झाला.पंचनामा हा शासनाच्या नियमानुसार आणि पारदर्शकपणे होणे अपेक्षित असताना, अधिकारी अशा प्रकारे शेतकरी विरोधी भूमिका का घेत आहेत, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. अशा प्रकारच्या बेजबाबदार विधानांमुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: null;
brp_mask:0;
brp_del_th:null;
brp_del_sen:null;
delta:null;
module: photo;hw-remosaic: false;touch: (0.5416667, 0.4528536);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 56;

पाचोरा परिवहन विभागातील कर्मचारी राजू चौधरी सेवानिवृत्त; ३४ वर्षांच्या प्रदीर्घ व यशस्वी सेवेचा आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते गौरव

प्रतिनिधी/पाचोरा :-

नगरदेवळा दर्पण मराठी लाईव्ह न्युज:-

परिवहन विभाग पाचोरा येथील कर्मचारी राजू शेषराव चौधरी हे वयोमानानुसार वयाची ५८ वर्षे पूर्ण करून ३१मे २०२६ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांनी परिवहन विभागात तब्बल ३४ वर्षे अविरत आणि यशस्वी सेवा बजावली. त्यांच्या या प्रदीर्घ सेवापूर्तीनिमित्त पाचोरा तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय किशोर अप्पा पाटील यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन त्यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी आमदार किशोर अप्पा पाटील यांनी राजू चौधरी यांना पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या. “त्यांचे पुढील आयुष्य सुख-समाधानाचे, समृद्धीचे आणि आनंदाचे जावो,” अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली. चौधरी यांच्या सेवेचा गौरव करताना आमदार म्हणाले,**”एसटीचा हा केवळ नोकरीचा प्रवास नव्हता, तर या प्रवासात त्यांनी त्याग, जनसेवा, सेवाभाव आणि समर्पण वृत्ती जोपासली. त्यांचा संपूर्ण कार्यकाळ हा इतरांसाठी प्रेरणादायी असाच होता.”

**राजू शेषराव चौधरी हे संजय शेषराव चौधरी, विजय शेषराव चौधरी आणि साहेबराव शेषराव चौधरी यांचे बंधू आहेत. विशेष म्हणजे, शिष्यवृत्ती परीक्षा व नवोदय विद्यालय परीक्षेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी उत्तीर्ण करून जिल्हा परिषद शाळा, ‘होल’ (ता. पाचोरा) चे नाव जिल्हा पातळीवर उंचावणारे आदर्श शिक्षक साहेबराव चौधरी यांचे ते मोठे बंधू आहेत.

**या कौतुक सोहळ्याप्रसंगी , शिक्षक सेना कार्याध्यक्ष जळगाव राजेंद्र भीमराव पाटील,शिक्षक सेना जिल्हा संघटक विजय पुरुषोत्तम ठाकूर, अल्पसंख्याक आघाडीचे तालुका प्रमुख जावेद रहीम, विनोद धनगर, शिवदास देवरे, यांच्यासह अनेक मान्यवर, मित्रपरिवार आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनीच राजू चौधरी यांच्या भावी वाटचालीस उत्स्फूर्त शुभेच्छा दिल्या.

*सेवेचा प्रदीर्घ प्रवासराजू शेषराव चौधरी यांनी आपल्या ३४ वर्षांच्या कार्यकाळात परिवहन विभागात अत्यंत प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने काम केले. या प्रदीर्घ सेवेदरम्यान त्यांनी आपल्या कामातून केवळ विभागाचा नावलौकिकच वाढवला नाही, तर आपल्या सहकाऱ्यांसाठी एक आदर्श निर्माण केला. त्यांच्या या निवृत्तीमुळे एका कार्यक्षम कर्मचाऱ्याने आपली सेवा पूर्ण केली असून, त्यांच्या कार्याची दखल सर्व स्तरातून घेतली जात आहे.

आमदारांच्या हस्ते सत्कार

सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना आमदार किशोर आप्पा पाटील यांनी राजू चौधरी यांच्या कामाचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले की, “सरकारी सेवेत ३४ वर्षांचा मोठा कालखंड अत्यंत संयमाने आणि निष्ठेने पूर्ण करणे ही साधी गोष्ट नाही. राजू चौधरी यांनी आपल्या संपूर्ण कार्यकाळात कर्तव्याशी कधीही तडजोड केली नाही. त्यांचे हे निवृत्तीनंतरचे आयुष्य सुख, समाधान आणि आरोग्यदायी जावो,” अशा शुभेच्छा आमदार किशोर आप्पा पाटील यांनी यावेळी दिल्या.

सहकाऱ्यांकडून कृतज्ञता:-

यावेळी परिवहन विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या मित्र परिवाराने उपस्थित राहून राजू चौधरी यांच्या गौरवपूर्ण कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आपल्या निवृत्तीच्या भावपूर्ण वातावरणात बोलताना राजू चौधरी यांनी आपल्या ३४ वर्षांच्या प्रवासात साथ देणाऱ्या सर्व वरिष्ठांचे, सहकाऱ्यांचे आणि परिवाराचे आभार मानले

नगरदेवळा होळ शिवारात निसर्गाचा कोप वादळी वाऱ्यासह पावसाने केळीच्या बागेचे अतोनात नुकसान

संपादक हसीबुर शेख ✍️:-

नगरदेवळा दर्पण मराठी लाईव्ह न्युज :-


नगरदेवळा परिसरातील होळ शिवारात काल झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. या अवकाळी संकटामुळे केळीच्या बागांचे मोठे नुकसान झाले असून, परिसरातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांचे ७० टक्के नुकसान:-
वादळी वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की, उभी केळीची पिके अक्षरशः जमिनीला लागली. या नैसर्गिक आपत्तीत खालील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे:
प्रकाश बाळीराम परदेशी
गंगासिंग राधाकिसन सिंग परदेशी
सुनील विठ्ठलसिंग परदेशी
अफजल खान फत्ते खान

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या शेतकऱ्यांच्या बागांचे जवळपास ७० टक्क्यांहून अधिक नुकसान झाले आहे. ऐन काढणीच्या काळात आलेल्या या संकटामुळे शेतकरी हवालदिल झाले असून, संपूर्ण वर्षभराची मेहनत क्षणात मातीमोल झाली आहे.

तातडीने पंचनाम्याची मागणी:-
केळी उत्पादक शेतकऱ्यांनी शासनाकडे मागणी केली आहे की, कृषी विभाग आणि महसूल विभागाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचे पंचनामे करावेत. या अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने शासनाने भरीव आर्थिक मदत जाहीर करावी, अशी आर्त हाक बाधित शेतकरी व ग्रामस्थांकडून दिली जात आहे.

शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान:-

प्रकाश बाळीराम परदेशी
गंगासिंग राधाकिसन सिंग परदेशी
सुनील विठ्ठल परदेशी
अफजल खान फत्ते खान
यांनी आपल्या शेतात मोठ्या मेहनतीने आणि भांडवल लावून केळीची लागवड केली होती. केळीची झाडे काढणीला निस्वाडला आलेली असतानाच ही नैसर्गिक आपत्ती ओढवल्याने प्रकाश बाळीराम परदेशी, गंगासिंग राधाकिसनसिंग परदेशी,सुनील विठ्ठल परदेशी,अफजल खान फत्ते खान

यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

प्रशासनाकडे मदतीची अपेक्षाकेळीच्या नुकसानीमुळे होळा शिवारा शेतकरी प्रकाश बाळीराम परदेशी
गंगासिंग राधाकिसन सिंग परदेशी
सुनील विठ्ठल परदेशी
अफजल खान फत्ते खान
यांचे मोठे आर्थिक कंबरडे मोडले आहे. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी शेतात धाव घेतली. दरम्यान, महसूल विभागाने आणि कृषी विभागाने त्वरित घटनास्थळी पंचनामा करावा, तसेच झालेल्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्याला तातडीने योग्य नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून जोर धरत आहे.

नगरदेवळा: वादळी वाऱ्यासह पावसाचा केळीच्या बागेला मोठा फटका शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान

संपादक हसीबुर शेख ✍️:-

नगरदेवळा दर्पण मराठी लाईव्ह न्युज :-

नगरदेवळा येथील होळ शिवारात निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका एका शेतकऱ्याला बसला आहे. येथील शेतकरी अफजल खान फत्ते खान यांच्या शेतात वादळी वारे आणि जोरदार पावसामुळे केळीच्या बागेचे अतोनात नुकसान झाले आहे ऐन काढणीला आलेल्या केळीच्या बागेचे होत्याचे नव्हते झाल्याने अफजल खान यांच्यावर मोठे संकट ओढवले आहे
गेल्या काही दिवसांपासून परिसरात वातावरणात अचानक बदल होऊन वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. या वादळी वाऱ्यांचा वेग इतका प्रचंड होता की, होळ शिवारातील अफजल खान यांच्या शेतातील केळीची शेकडो झाडे अक्षरश मुळापासून उमळून पडली आहेत. शेतात लागवड केलेली केळीची बाग पूर्णपणे भुईसपाट झाली असून, पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान:-
अफजल खान यांनी आपल्या शेतात मोठ्या मेहनतीने आणि भांडवल लावून केळीची लागवड केली होती. केळीची झाडे काढणीला निस्वाडला आलेली असतानाच ही नैसर्गिक आपत्ती ओढवल्याने अफजल खान यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

प्रशासनाकडे मदतीची अपेक्षा:-
केळीच्या नुकसानीमुळे अफजल खान यांचे मोठे आर्थिक कंबरडे मोडले आहे. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी शेतात धाव घेतली. दरम्यान, महसूल विभागाने आणि कृषी विभागाने त्वरित घटनास्थळी पंचनामा करावा, तसेच झालेल्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्याला तातडीने योग्य नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून जोर धरत आहे.

नगरदेवळा परिसरात मान्सूनपूर्व पावसाचा दणका: मुसळधार पावसासह गारांचा वर्षाव

संपादक हसीबुर शेख ✍️:-

नगरदेवळा दर्पण मराठी लाईव्ह न्युज:-

नगरदेवळा (३१ मे २०२६): जून महिन्याच्या आगमनाची चाहूल लागलेली असतानाच, आज ३१ मे रोजी नगरदेवळा परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. सायंकाळच्या सुमारास अचानक वातावरण बदलले आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने परिसराला झोडपून काढले. या पावसासोबतच काही भागांत गाराही पडल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उ दुपारनंतर आकाशात ढगांची गर्दी झाली होती, त्यानंतर सायंकाळी पावसाने जोरदार सुरुवात केली. पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असला तरी, गारांच्या माऱ्यामुळे बागायतदार आणि शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

अचानक आलेल्या पावसामुळे रस्त्यावरील नागरिकांची आणि वाहनधारकांची मोठी धावपळ झाली.

शेतकऱ्यांपुढे चिंतेचे सावट

​नगरदेवळा परिसरातील अनेक शेतकरी मान्सूनच्या पेरणीपूर्व तयारीला लागले आहेत. मात्र, आज झालेल्या या अवेळी पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचे काही प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रशासनाकडून अद्याप नुकसानीचा अधिकृत आकडा जाहीर झालेला नाही, परंतु स्थानिक शेतकऱ्यांकडून शेतातील परिस्थितीचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे.

हवामान विभागाचा अंदाज:

हवामान खात्याने पुढील काही दिवसांत पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला असून, नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नगरदेवळा वासीयांसाठी आनंदाची बातमी: २.५ कोटींच्या निधीतून पूल नूतनीकरण व ४ किमी रस्त्याचे होणार डांबरीकरण

संपादक हसीबुर शेख ✍️ :-
नगरदेवळा दर्पण मराठी लाईव्ह न्युज:-

नगरदेवळा परिसरातील नागरिकांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून गडद नदीवरील पुलाचे नूतनीकरण आणि नगरदेवळा ते नगरदेवळा रेल्वे स्टेशनपर्यंतच्या चार किलोमीटर रस्त्याच्या डांबरी करणासाठी तब्बल २ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे परिसरातील वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागणार असून प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे.
काय काय होणार कामे?
सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता दीपक पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, या विकासकामांतर्गत खालील बाबींचा समावेश आहे:
गडद नदीवरील पुलाचे नूतनीकरण: पुलाची दुरवस्था पाहता त्याचे बळकटीकरण करण्यात येणार आहे.
सुरक्षिततेसाठी कठडे: पुलाच्या दोन्ही बाजूंना नवीन आणि मजबूत संरक्षक कठडे (Railings) बसविण्यात येणार आहेत, ज्यामुळे अपघातांचा धोका टळेल.
रस्त्याचे डांबरीकरण: नगरदेवळा ते नगरदेवळा रेल्वे स्टेशन या चार किलोमीटरच्या प्रमुख मार्गाचे संपूर्ण डांबरीकरण करण्यात येणार आहे.
खड्डे मुक्ती: पुलावरील खड्डे बुजवून रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे सुस्थितीत केला जाईल.
पावसाळ्यानंतर कामाला मिळणार गती
सध्या पावसाळा तोंडावर असल्याने प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणे तांत्रिकदृष्ट्या कठीण आहे. मात्र, पावसाळा संपताच युद्धपातळीवर या कामांना सुरुवात केली जाईल, अशी ग्वाही उपअभियंता दीपक पाटील यांनी दिली आहे. निधी मंजूर झाल्यामुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, या कामांमुळे परिसरातील दळणवळण अधिक गतिमान आणि सुरक्षित होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

भडगाव-पाचोरा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या अथक प्रयत्नांमुळे मतदारसंघातील महत्त्वाच्या पूल आणि रस्त्यांच्या कामांना गती मिळाली आहे. राज्य शासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करून आमदार किशोर आप्पा पाटील यांनी या कामांसाठी मोठा निधी मंजूर करून घेतला आहे.
याबाबत अधिक माहिती देताना शिवसेना जळगाव जिल्हाप्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब मनोहर गिरधर पाटील यांनी सांगितले की, मतदारसंघातील पायाभूत सुविधांचे जाळे विणण्यासाठी आमदार किशोर आप्पा पाटील अत्यंत आग्रही आहेत. मतदारसंघातील नागरिकांची दळणवळणाची समस्या कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी त्यांनी घेतलेली भूमिका आणि शासन दरबारी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे हे फळ आहे. त्यांच्या या कार्यतत्परतेमुळेच प्रलंबित असलेल्या पूल आणि रस्ते दुरुस्तीच्या कामांना आता प्रत्यक्ष मंजुरी मिळाली असून, विकासकामांना मोठी चालना मिळणार आहे.
आमदारांच्या पाठपुराव्याची वैशिष्ट्ये:
सातत्यपूर्ण पाठपुरावा:
राज्य शासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सातत्याने समन्वय साधला.
विकासाचा ध्यास: दुर्गम आणि ग्रामीण भागातील रस्ते व पूल बांधकामावर विशेष लक्ष केंद्रित केले.
नागरिकांना दिलासा: या कामांमुळे पावसाळ्यात होणारा त्रास थांबणार असून नागरिकांचा प्रवास सुखकर होणार आहे.
स्थानिक जनतेच्या समस्यांकडे गांभीर्याने पाहून, त्या मार्गी लावणाऱ्या आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या या कामगिरीचे सर्वस्तरातून स्वागत होत आहे. लवकरच या कामांचा प्रत्यक्ष प्रारंभ होणार असून, यामुळे मतदारसंघाच्या विकासात भर पडणार आहे

नगरदेवळा येथील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पूल आणि रस्त्याच्या कामाला लवकरच गती मिळणार आहे. वाढती वाहतूक आणि भविष्यातील गरजा लक्षात घेता, या मार्गाचे तातडीने मजबुतीकरण करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून वाहतुकीची समस्या सुटण्यास मदत होणार आहे.
सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश :-या कामासाठी स्थानिक स्तरावरून सातत्याने पाठपुरावा सुरू होता.

शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या शिष्टमंडळात माजी उपसरपंच सागर पाटील, युवा नेते गणेश देशमुख आणि आमदार किशोर आप्पा पाटील यांचे स्वीय सहाय्यक राजेश पाटील यांचा समावेश होता.

या सर्वांनी एकत्रितपणे निवेदन देऊन या कामाचे गांभीर्य पटवून दिले होते.
प्रकल्पाचे महत्त्व
वाहतूक कोंडीतून मुक्ती:- या पुलाच्या आणि रस्त्याच्या मजबुतीकरणामुळे सध्याची वाहतूक कोंडीची समस्या संपुष्टात येईल.
भविष्यातील नियोजनाचा विचार:- वाढत्या शहरीकरणामुळे भविष्यात वाढणाऱ्या वाहतुकीचा ताण लक्षात घेऊन हे काम दर्जेदार पद्धतीने केले जाणार आहे.
नागरिकांची सुविधा:- स्थानिक रहिवासी, विद्यार्थी आणि चाकरमान्यांच्या दैनंदिन प्रवासाचा वेळ वाचणार असून प्रवास अधिक सुरक्षित होणार आहे.
स्थानिक प्रशासनाच्या या सकारात्मक निर्णयाचे नागरिकांकडून स्वागत होत असून, लवकरच या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ही बातमी ‘दर्पण मराठी न्यूज लाईव्ह’ साठी हसीबुर शेख (मुख्य संपादक) यांच्याकडून प्रसारित करण्यात येत आहे

नगरदेवळा येथील पोलीस कॉन्स्टेबल दिनेश महादू पाटील यांना ‘जीवन रक्षक’ पुरस्काराने सन्मानित

संपादक हसीबुर शेख ✍️ :-

नगरदेवळा दर्पण मराठी लाईव्ह न्युज :-

नगरदेवळा: पाचोरा पोलीस स्टेशन अंतर्गत नगरदेवळा येथे कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष पोलीस कॉन्स्टेबल दिनेश महादू पाटील यांना ‘दिव्य मराठी’ वृत्तपत्र समूहातर्फे प्रतिष्ठेच्या ‘जीवन रक्षक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या हस्ते हा गौरव सोहळा पार पडला.

शौर्य आणि कर्तव्यदक्षतेचा गौरव:-

पोलीस कॉन्स्टेबल दिनेश पाटील यांनी आपल्या सेवेदरम्यान दाखवलेली तत्परता, माणुसकी आणि संकटकाळी नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी केलेली धडपड लक्षात घेऊन या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली होती. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिनेश पाटील यांच्या कार्याचे कौतुक करताना, त्यांच्यासारखे अधिकारी पोलीस दलाची प्रतिमा उंचावत असल्याचे गौरवोद्गार काढले.

परिसरामध्ये आनंदाचे वातावरण:-

दिनेश पाटील यांना मिळालेल्या या सन्मानामुळे नगरदेवळा परिसरात आणि पोलीस वर्तुळात आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या या यशाचे सर्वस्तरातून स्वागत होत असून, मित्रपरिवार, वरिष्ठ अधिकारी आणि नागरिकांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

दिनेश पाटील यांच्या या कामगिरीमुळे पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असून, त्यांना या पुढील वाटचालीस अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.दिनेश पाटील यांच्या या विशेष कामगिरीबद्दल आणि सन्मानाबद्दल तुमचे मनःपूर्वक अभिनंदन!

जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर तुकाराम मुंढेंचा ‘वज्रघात’! ३ दिवसांत ३३ अटकेसह २७ आस्थापनांना टाळे

(संपादक हसीबुर शेख):- ✍️

(नगरदेवळा दर्पण मराठी लाईव्ह न्युज):-

​महाराष्ट्र राज्यातील अन्न आणि औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारताच, आपल्या धडाकेबाज कामकाजासाठी प्रसिद्ध असलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी भ्रष्ट आणि बेजबाबदार व्यावसायिकांविरुद्ध मोठी मोहीम उघडली आहे. “जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांची खैर नाही,” असा सज्जड इशारा देत, केवळ ३ दिवसांच्या कालावधीत राज्यभरात धडक कारवाई करत ३३ जणांना अटक करण्यात आली असून २७ आस्थापनांना कायमचे टाळे ठोकण्यात आले आहे.

कारवाईचा सविस्तर तपशील

​तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर तातडीने प्रशासकीय यंत्रणेला ‘ॲक्शन मोड’मध्ये आणले. या कारवाईचे प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे आहेत:

  • वेगवान कारवाई: अवघ्या ७२ तासांच्या आत राज्यभरात ही मोठी मोहीम राबवण्यात आली.
  • अटकेची कारवाई: नियमबाह्य औषध विक्री, भेसळयुक्त अन्नपदार्थ आणि बनावट औषधांच्या निर्मिती प्रकरणी ३३ संशयितांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
  • आस्थापनांवर कारवाई: नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि परवाना नसताना सुरू असलेल्या २७ आस्थापनांना (दुकाने/कारखाने) प्रशासनाने त्वरित सील केले आहे.
  • प्रमुख उद्देश: सामान्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर वचक निर्माण करणे आणि बाजारपेठेत निकृष्ट दर्जाच्या औषधांची व अन्नाची होणारी विक्री रोखणे.

तुकाराम मुंढे यांची ठाम भूमिका

​या कारवाईनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले की, जनतेचे आरोग्य ही सर्वोच्च प्राथमिकता आहे.

​”अन्न आणि औषध विभागात कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार किंवा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. लोकांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार कोणालाही नाही.”

सामान्य नागरिकांसाठी आवाहन

​FDA ने राज्यातील नागरिकांना आवाहन केले आहे की, जर तुम्हाला कोणत्याही दुकानात किंवा कारखान्यात संशयास्पद हालचाली, बनावट औषधे किंवा भेसळयुक्त अन्नपदार्थ आढळल्यास, तत्काळ अन्न आणि औषध विभागाच्या टोल-फ्री क्रमांकावर किंवा अधिकृत पोर्टलवर तक्रार करावी. तुमची माहिती गोपनीय ठेवली जाईल.

तुकाराम मुंढे यांच्या या धडाकेबाज सुरुवातीमुळे औषध आणि अन्न व्यवसायातील अनधिकृत व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

अशा प्रकारच्या कठोर प्रशासकीय निर्णयामुळे राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम आणि सुरक्षित होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.